ऑनलाईन टीम / तरुण भारत :
5G service is starting in INDIA from today देशात आजपासून 5G सेवा सुरू होत आहे. दिल्लीत आयोजित ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G दूरसंचार सेवेचा औपचारिक शुभारंभ केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई, पुण्यासह 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 5G सेवा ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 4G च्या तुलनेत ही सेवा 10 पट वेगवान असणार आहे. 5G सेवा सुरू होणार असल्याने अनेक मोबाईल कंपन्यांनी आगोदरच 5G मोबाईल लाँच केले आहेत. सध्या बाजारात 4G सिमकार्ड उपलब्ध आहेत. ग्राहकांना ही सिमकार्ड 5G मध्ये अपग्रेड करता येणार आहेत. त्यामुळे सिमकार्ड बदलण्याची गरज भासणार नाही.
अधिक वाचा : …तर उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऐकणार
मात्र, ग्राहकांना 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे 5G मोबाईल असणे आवश्यक आहे. 4G स्मार्टफोनमध्ये 5G सेवा चालवता येईल, असं म्हटलं जात होतं. मात्र 5G सेवा फक्त 5G स्मार्टफोनमध्येच चालेल असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ग्राहकांना ही सेवा वापरण्यासाठी 5G मोबाईल खरेदी करावे लागणार आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल यांच्या उपस्थितीत काही वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.