नवी दिल्ली
प्राप्तीकर विभागाने चालू आर्थिक वर्षात पहिल्या 5 महिन्यात 67 हजार 400 कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) करदात्यांना दिला आहे. सीबीटीडी (केंद्रीय प्रत्यक्ष कर संकलन विभाग) विभागाने ही माहिती नुकतीच दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 30 ऑगस्ट दरम्यान 23.99 लाख करदात्यांना 67 हजार 401 कोटी रुपये रिफंड केले आहेत. 22.61 लाख वैयक्तिक करदात्यांना 16 हजार 373 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला असल्याचे प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. ओडिशा राज्याच्या जीएसटी संकलनात वर्षाच्या तुलनेत 41 टक्के वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.