सुर्ला आमेफाळ कात्रे येथील घटना : विकृत मानसिकतेतून आग लावल्याचा संशय : नागरिकांकडून निषेध
प्रतिनिधी /सांखळी
सांखळी सुर्ला परिसरात शेतकऱयांसाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाची जलवाहिनी जळल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नाने मायनिंग पीठातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने एक नवीन प्रकल्प राबवला आहे. तो पूर्णत्वास येत असताच काही विकृत लोकांनी ही जलवाहिनी जाळल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही घटना नुकतीच आमेफाळ कात्रे येथे घडली.
दरम्यान, सुर्ला ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन या घटनेचा निषेध केला. बैठकीला सरपंच विश्रांती सुर्लकर, उपसरपंच भोला खोडगिणकर, पंच सुभाष फोंडेकर, बाबलो नाटेकर, ओंकार केळकर, सुर्ला सोसायटी चेअरमन उदय नाटेकर, मनोहर वळवईकर, आनंद फोंडेकर, विष्णू वळवईकर, वसंत कालेकर, कालिदास बर्वे, हरी मराठे, अशोक खोडगिणकर आदी उपस्थिती होते.
कृत्य करणाऱयाची गय नाही : सरपंच
गावातील काही विघ्न निर्माण करणारी माणसे गावातील विविध सामाजिक प्रकल्पाना विरोधाला विरोध म्हणून विरोध करतात. हे योग्य नाही. जलवाहिनी जाळण्याचे कृत्य करणाऱयांची गय करणार नाही. अशा विकृतीविरोधात संबंधीत अधिकाऱयांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे, असे मत सरपंच विश्रांती सुर्लकर यांनी व्यक्त केले.
जलवाहिनी जाळण्याचा प्रकार करणाऱया विकृत नराधमांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधी विष्णू नाटेकर यांनी केली. ओंकार केळकर, उदय नाटेकर यांनीही घटनेचा निषेध केला.