जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकार्यांचा पुढाकार
प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेतर्फे शुक्रवारी हातकणंगले तालुक्यात 7 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात आले.
हातकणंगले तालुका रास्त भाव रेशन दुकान संघटनेतर्फे तालुक्यात विविध ठिकाणी तिरंगा ध्वज वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम केंद्र सरकारनं हाती घेतला आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत होणार्या या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि हातकणंगले तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीपतराव पाटील यांच्या उपस्थितीत शिरोली, टोप, नागांव, कोरोची यासह इतर गावांमध्ये 7 हजार तिरंगा ध्वज विविध ठिकाणी वितरित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे दतात्रय गावडे, रूपाली कुंभार, संगिता चौगुले, वैशाली शिंदे अनिता शिंदे, सुनिता समुद्रे, अलका गावडे, छाया थोरवत, अनुसया पुजारी, कामाबाई गावडे, सुरेशराव पाटील, महादेव साळुंखे, राजेश पाटील, अनिल कोळी, आनंदा गोडेकर यांच्यासह रेशन दुकानदार सहभागी झाले होते.