प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयामार्फत `माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आहे. या अभियानांतर्गत वायू प्रदुषण रोखण्यासाठी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करण्याचा ठराव जिह्यातील 722 ग्रामपंचायतींनी केला आहे. तर उर्वरित ग्रामपंचायती लवकरच जि.प.कडे ठराव सादर करतील. त्यामुळे आतषबाजीशिवाय ग्रामीण भागातील दिवाळी साजरी होणार असल्याची माहिती जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांनी `माझी वसुंधरा अभियान’ हाती घेतले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या त्यांनी प्रशासनास सूचना दिल्या आहे. त्यामध्ये सहभागी होऊन यशस्वीपणे उपक्रम राबविणाऱया ग्रामपंचायतींना शासनाने सध्या बक्षीस जाहीर केले नसले तरी आगामी काळात यशस्वी ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर निधी दिला जाण्याची शक्यता आहे. जिह्यात 1025 एकूण ग्रामपंचायती असून त्यापैकी सध्या 722 ग्रामपंचायतींनी फटाकेमुक्त दिवाळीचा ठराव करून जि.प.कडे सादर केले आहेत. येत्या आठवडÎाभरात म्हणजेच दिवाळीपूर्वी उर्वरित सर्व ग्रामपंचायती ठराव करणार आहेत. त्यामुळे जिह्याच्या ग्रामीण भागात यंदाची दिवाळी आवाज आणि धूरविरहित साजरी होणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.