स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशातील ‘७५ समुद्रकिनारे’ स्वच्छ करण्यात येणार आहेत. ही मोहीम पंच्याहत्तर दिवसांची असून ३ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत ती पूर्ण होणार आहे.
या मोहिमेचा उद्देश समुद्रकिनाऱ्यांवरील एक हजार पाचशे टन कचरा उचलणे हा आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. १७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिन साजरा करण्यात येणार आहे. यासंबंधी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.