शहरातील 55 फिरस्त्यांना महापालिकेचा आसरा : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील तब्बल 55 फिरस्त्यांना महापालिकेने आसरा दिला आहे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या आरोग्य विभागाने जलदकृती करत गेल्या तीन दिवसांत शहरात फिरणाऱया व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांची महापालिकेच्या पाच निवारा केंद्रावर रवानगी करण्यात आली. तेथेच त्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
शहरात फिरस्त्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. रंकाळा तलाव, मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि अंबाबाई मंदिर, भवानी मंडप परिसरात अनेक फिरस्ते फिरत असतात. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी या फिरस्त्यांची पाहणी करून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार फिरस्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 21 आणि 26 फिरस्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सोमवारी आणखीन 10 फिरस्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील देघांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत 8 जणांना निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे. पाच केंद्रे तयार करण्यात आली असून या ठिकाणी फिरस्त्यांसाठी भोजन व निवासाची सुविधा देण्यात आली आहे. फिरस्त्यांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या शाळेत त्यांच्या निवाऱयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.