नवी दिल्ली
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्राहकांनी खर्चावर बऱयापैकी नियंत्रण मिळवले असल्याचे सांगण्यात येत आहे. सल्लागार क्षेत्रातील फर्म केपीएमजीच्या मते कोरोनाच्या काळात भारतातील 78 टक्के ग्राहकांनी खर्चावर बऱयापैकी नियंत्रण मिळवलं आहे. याचाच अर्थ खर्च कमीत कमी करण्यावर अनेकांनी भर दिला आहे, हेही पाहणीतून स्पष्ट होतं. म्हणजेच खर्च आटोक्मयात करण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी प्राधान्य दिलं आहे. टायर-1 पेक्षा टायर-2 व टायरö3 शहरात मात्र लोक दोन तृतीयांश अधिक खर्च करत असल्याचेही पाहणीत आढळून आले आहे.