नवी दिल्ली
जम्मू क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर 30 मे-20 जानेवारी 2020 या कालावधीत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 2335 घटना घडल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली आहे.
जम्मू क्षेत्रात भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर 30 मे-15 जानेवारी 2020 या कालावधीत गोळीबाराच्या 177 घटना घडल्या आहेत. अशा घटनांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांची गरज पूर्ण करण्याकरता पुरेशी तरतूद केली जात असल्याचे नाईक म्हणाले.
शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना पाहता भारतात सुरक्षेचे उपाय योजण्यात आले आहेत. दहशतवाद्यांची घुसखोरी होऊ नये यासाठी पावले उचलण्यात आली असली तरीही अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. सैन्य या स्थितीकरता पूर्णपणे दक्षत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.