नवी दिल्ली
जूनच्या पहिल्या चार सत्रात परदेशी गुंतवणकदारांनी भारतीय भांडवली बाजारात 8 हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या घटीनंतर भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीवर अधिक भर दिला आहे. देशात कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत असून परिस्थितीत सुधारणा होत आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण मोहिम अधिक तीव्र झाल्यावर बाजारात गुंतवणूकदार अधिक गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील, असे तज्ञांना वाटते आहे. 1 ते 7 जून या काळात गुंतवणूकदारांनी 7 हजार 968 कोटी रुपये बाजारात गुंतवले आहेत.