बेळगाव-खानापूर तालुके आघाडीवर : 299-399 योजनेला उत्तम प्रतिसाद : सर्वसामान्य नागरिकांना महत्त्वपूर्ण
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वसामान्यांना अपघाती विमा कवच मिळावे, या उद्देशाने भारतीय पोस्ट विभागाने विमा कवच योजना महिन्याभरापूर्वी सुरू केली आहे. या योजनेला जिल्हय़ात उत्तम प्रतिसाद मिळाला असून 8 हजार 500 जणांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. बेळगाव व खानापूर तालुक्मयात सर्वाधिक नोंदणी झाली असून इतर तालुक्मयांमध्ये पोस्ट विभागाकडून जागृती करण्यात येत आहे.
भारतीय पोस्ट विभागाने टाटा एआयजीच्या सहकार्याने अपघात विमा योजना आखली. प्रतिवषी 299 व 399 रुपये हप्त्यांमध्ये विमाधारकाला दहा लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना अपघाती विमा कवच मिळावे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली. 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. औद्योगिक कामगारांना ईएसआय, तसेच खासगी क्षेत्रातील कामगारांना अनेक हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना विमा कवच मिळण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रत्येक गावात आजही बँका नसल्या तरी पोस्ट कार्यालये असल्याने योजना राबविणे सोयीचे ठरत आहे.
अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने विमा कवच गरजेचे बनले आहे. आपल्या पाठीमागे कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पोस्ट विमा कवच करून घेतले जात आहे. 299 अथवा 399 ही रक्कम वर्षातून एकदाच भरावी लागणार असल्याने नागरिकांचा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. बेळगाव जिल्हय़ात एकूण 8 हजार 500 नागरिकांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत योजनेसाठी नोंदणी केली आहे.
योजनेमध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तीला एका वर्षात 10 लाखांपर्यंत विमा मिळू शकतो. विमाधारकाचा अपघाती मृत्यू, दिव्यांगत्व अथवा कायमचे दिव्यांगत्व आल्यास रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च अथवा रुग्णालयात दाखल न होता उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावा करता येणार आहे. रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस प्रतिदिन एक हजार रुपये ग्राहकांना मिळणार आहेत. कोणत्याही कारणाने अपघात झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
योजनेचा कालावधी
या योजनेचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. पुढील वषी पुन्हा नूतनीकरण करावे लागणार आहे. या योजनेमध्ये उपचारांसाठीही रक्कम मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन योजनेची नोंदणी करता येणार आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढावे लागणार आहे.