प्रतिनिधी/ रत्नागिरी
सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात जेईईसाठी शनिवारी जिल्हय़ातील दोन केंद्रांवर सुमारे 800 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 1 ते 6 सप्टेंबर हा कालावधीत देशभरात या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेतून अभियांत्रिकी विद्यालयामध्ये प्र प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्जुंतीकीकरण आणि मास्कचा वापर अनिवार्य ठरवण्यात आला आहे.
12 वी नंतर चांगल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. यात उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी प्रतिष्ठीत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात. यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान या परीक्षा देशभर पार पडत आहेत. रत्नागिरी रेल्वेस्टेशननजीक ल खेड तालुक्यातील घरडा महाविद्यालयात यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्या †िठकाणी परीक्षेची सारी कार्यवाही पार पडत आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जेईई परीक्षा घेण्याचा आव्हान अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी पोहोचावे असे विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्जुंतीकीकरण, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे एकूण 540 विद्यार्थी परीक्षार्थी असून दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहेत. खेड येथे 260-270 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, एका बॅचला 45 विद्यार्थी परीक्षा देत असतात. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या परीक्षेवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी परीक्षा केंद्रांना सहाय्य करत आहेत. सकाळी 9 ते 10 आणि दुपारी 3 ते 6 अशा दोन सत्रात परीक्षा पार पडत आहे. अशी माहिती एनटीएचे परीक्षा नियंत्रक डॉ. नितीन कोळेकर यांनी दिली.
अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाचा उपयोग करून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचावे लागत आहे. लवकरचे सत्र असल्याने काही विद्यार्थी मुक्कामाला केंद्राच्या आसपास जाऊन थांबत आहेत.