ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातून विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत, याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुर्बल शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचे सरकारचे ध्येय्य आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. गरीब जनतेला एक वर्ष मोफत धान्य देण्यात येणार आहे. तसेच 81 लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा सितारामन यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना डिजीटल ट्रेनिंग देऊन डिजीटल विकासावर भर दिला जाणार आहे. पीएम मत्स्य संपदा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ हजार कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे. डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार आहे. कोल्ड स्टोरेज वाढविण्यात येणार आहे. कृषी एक्सिलेटरची स्थापना करून शेतकऱ्यांना विशेष निधी देण्यात येणार आहे.आदिवासी विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील. गरीब कैद्यांच्या जामिनासाठी आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येणार आहे. शाळकरी मुलांसाठी डिजिटल ग्रंथालय योजना उभारणार येणार आहे. पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : अर्थसंकल्पासाठी अधिकारी असतात 10 दिवस बंदिवासात
1 जानेवारी 2023 पासून एक वर्षासाठी सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही सितारामन यांनी सांगितले.