ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
व्हिसा अटींचे उल्लंघन आणि इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी तब्बल 81 चिनी नागरिकांना ‘भारत सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. आतापर्यंत चीन या देशातील इतर 117 लोकांना हद्दपार करण्यात आले, अशी माहिती मंगळवारी लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. केंद्रीय राज्यमंत्री यांनी असही सांगितले आहे की, आणखी 726 चीनी नागरिकांना ‘प्रतिकूल यादी’मध्ये ठेवण्यात आले आहे.
लेखी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, “कायदेशीर प्रवासी कागदपत्रांसह भारतात प्रवेश करणार्या चिनी नागरिकांसह इतर परदेशी लोकांच्या नोंदी सरकार ठेवते. ते म्हणाले की यापैकी काही परदेशी लोक अज्ञानामुळे, तसेच वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे व्हिसा कालावधी ओलांडतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.”