दंडात्मक कारवाईतील सातत्याचा परिणाम, तीन वर्षातील सकारात्मक बदल, कडक उन्हातही हेल्मेटचा वापर
प्रतिनिधी /बेळगाव
हेल्मेट वापरा असा आदेश आला की कपाळाला आठय़ा पाडून कशाला ती वाढीव डोकेदुखी असे म्हणणारे बेळगावकर दोन-तीन वर्षात चांगलेच सुधारले आहेत. कडक उन्हात घामाच्या धारा वाहत असतानाही एकूण दुचाकीस्वारांपैकी 90 टक्के जण हेल्मेटचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात बेळगावकरांना आता हेल्मेटची सवय झाली आहे. रहदारी पोलिसांनी दंडात्मक कारवाईच्या बाबतीत ठेवलेले सातत्य याला कारणीभूत आहे. याचबरोबरीने स्वतःच्या जीवाची काळजी या कारणासाठीही बरेचजण मोटारसायकलवर स्वार होताना डोकेदुखी म्हणून नव्हे तर गरज म्हणून हेल्मेट परिधान करू लागले आहेत. त्यामुळे ही सुधारणा झाली आहे.
यापूर्वी बेळगावकर हेल्मेट म्हणजे डोकेदुखीच म्हणत. मात्र आता याला अंगवळणी लावून घेतले आहे. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. हेल्मेट सक्तीचा आदेश आला की 3 ते 4 दिवस हेल्मेट वापरुन पुन्हा तपासणी बंद झाली की उघडय़ा डोक्मयांनी गाडी चालविणे सुरू व्हायचे. त्यामुळे बेळगावकरांना हेल्मेट सक्तीचा आदेश म्हणजे काहीच फरक वाटत नव्हता. चार दिवसांत पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था व्हायची. त्यामुळे हेल्मेट सक्तीचे प्रयत्न फोल ठरत होते.
बऱयाच वर्षांनी पोलिसांनी चौकाचौकात थांबू लागले की लोक हेल्मेट बाहेर काढायचे. पोलिसांनी रोज तपासणी सुरू ठेवावी. अधूनमधून तपासणी थांबली की आम्हाला कळत नाही, अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळायच्या. थोडक्मयात स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नव्हे तर पोलीस कारवाई करतात म्हणून मनात नसताना हेल्मेट वापरण्याची वेळ नागरिकांवर आली होती. मात्र आता त्यामध्ये मोठा बदल झाला आहे. आता तर मागे बसणाऱया व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता हा आदेश आला असला तरी अजून म्हणावा तसा त्याचा उपयोग होताना दिसत नाही. शहरातील सिग्नलवर थांबणाऱया मोटारसायकलचा आढावा घेतला असता एकावेळी 10 जण थांबलेले असल्यास यापैकी किमान 9 जणांच्या डोकीवर हेल्मेट दिसू लागले आहे.
अपवादात्मक एक, दोन जण विनाहेल्मेटचे असतात. सिग्नल ओलांडताना किंवा ओलांडण्यापूर्वीच त्यांना दंडात्मक कारवाईचा प्रसाद मिळतो. यामुळे त्यांचीही गणना पुढील कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटधारी मोटारसायकलस्वारांमध्ये होवू लागली आहे. सकाळी 9 पूर्वी आणि रात्री 9 नंतर मात्र हेल्मेट न घालता वाहने चालविणाऱयांची संख्या जास्त आहे. उकाडा असल्याने हेल्मेट गाडीला अडकवून शितल गारव्याचा अनुभव घेत अनेक जण आपल्या मोटारसायकली चालविताना या ठराविक वेळेत दिसून येत आहेत. सकाळच्यावेळी जीम, स्वीमिंग किंवा भाजी खरेदीसाठी जाणाऱया पुरुष व महिला वर्गातही हेल्मेटचा वापर कमी आढळतो. मात्र पोलिसांनीही 10 नंतरच कारवाईस प्रारंभ करून ही सवलत देवू केली आहे. किमान सकाळी व रात्री काही काळ दंडात्मक कारवाई होत नसल्याने मिळणारे थोडे स्वातंत्र्य वगळता इतर काळात मात्र मोटारसायकल स्टार्ट करण्यापूर्वी डोकीवर हेल्मेट आहे की नाही, याची खबरदारी प्रत्येकजण काळजीपूर्वकरित्या घेवू लागला आहे.
तरुण वर्गाचे केसांच्या स्टाईलपेक्षा हेल्मेट वापराला प्राधान्य
सातत्याने कारवाई सुरू झाल्यामुळे हेल्मेटची सवय मोटारसायकलस्वारांना झाली आहे. गाडीवर स्वार होताना इतर वस्तुंबरोबरच माझे हेल्मेट कोठे आहे? हे पाहण्याची. कोठेही गेल्यावर हेल्मेट विसरले जावू नये याची काळजी घेण्याची तसेच मोटारसायकललाच हेल्मेटसाठी स्वतंत्र लॉक बसविण्याची सवय आता बेळगावकरांना लागली आहे. बेळगाव शहरातील रस्त्यांवर चालणाऱया दुचाकींचा आढावा घेतला असता काही अपवादात्मक विनाहेल्मेट मोटारसायकलस्वार वगळता बाकी सर्वजण हेल्मेटचा वापर करू लागले आहेत. विशेषतः महिला वर्गात आणि केसांची स्टाईल करणाऱया तरुण वर्गातही हेल्मेट वापराचे प्रमाण वाढलेले आहे.