५८८४ क्यूसेकने विसर्ग सुरू, विसर्ग वाढण्याचा जलसंपदा विभागाचा अंदाज
राधानगरी /प्रतिनिधी
राधानगरी धरणपाणलोट क्षेत्रात काल रविवारी पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले होते. मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटे सव्वापाच वाजता तीन क्रमांकाचा दरवाजा बंद होऊन दोन दरवाजामधून विसर्ग सुरू होता. पुन्हा आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी साडेसहा वाजता दरवाजा क्रमांक तीन खुला झाला आणखीन दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे विसर्ग वाढण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.
स्वयंचलित द्वार क्रं 3 द्वार क्रमांक ५ आणि ६ या 3 दरवाज्यातून ५८८४ क्यूसेक्सने आणि वीजनिर्मिती सांडव्यातून १६०० क्यूसेक्स असा एकूण ५८८४ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. आज दिवसभरातील आठ तासामध्ये ७७ मिलिमीटर पाऊस झाला, तर एकूण ३९९० मिलिमीटर इतका पाऊस नोंदला आहे. आज दुपारी ४ वाजता, धरणाची पाणी पातळी ३४७.५४ मिलीमीटर होती