केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे मत
पणजी : सांखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीत निर्भेळ यश संपादन केल्याबद्दल भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. भाजप लढवय्या आणि अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला अतूट विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.