Vikram Pawaskar News : तिरंगा शेजारी भगवा ध्वज प्रत्येकाने लावावा असे आवाहन भाजप नेते विक्रम पावसकर यांनी आज केलं. संभाजी भिडेंनंतर विक्रम पावसकर यांनी भगवा फडकवण्याचे आवाहन केले आहे. तिरंग्याला जेवढा मान तेवढाच भगव्याला मान आहे. येणाऱ्या काळात तिरंग्या बरोबर भगवा फडकवला तरी हरकत नाही.पूर्वजांपासून भगवा ध्वज चालत आला असल्याचे आज त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
यावेळी बोलताना ते म्हणाल की, शाळेमध्ये हिंदूनी टिकली लावली, दोरा बांधला तर अडवणूक होत आहे.इतर धर्माची मात्र अडवणूक केली जात नाही. हिंदू मुले धार्मिकता जपण्याचे काम करत आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असतो.धार्मिकता जपण्याचे काम हिंदू मुल-मुली करत आहेत. मात्र त्यांना अडवणूक केली तर हिंदू रस्त्यावर उतरेल असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, औरंगजेब हा भारताचा शत्रू होता. हे सगळ्यांनी मान्य करायला हव. जे कोणी औरंगजेबाचे उदोउदो करत आहेत त्यांनी राजकारण बंद करा. अन्यथा भविष्य अंधारात जाऊ शकते. भारत हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे. भविष्याची चिंता असेल तर उदोउदो बंद करा असं आवाहनही विक्रम पावसकर यांनी केलं.महाराष्ट्रात लव जिहादचा कडक कायदा यावा यासाठी महाराष्ट्रभर 100 मोर्चे झाले. सात जणांची समिती स्थापन केली आहे.आताचे सरकार यावर पॉझीटीव्ह विचार करत आहेत. उत्तर प्रदेशामध्ये हा कायदा पारीत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लवकर होईल असं वाटतय,असेही ते म्हणाले.