बेळगाव : भेंडी बाजार परिसरातील गटारींमध्ये कचरा साचून होता. तो कचरा काढावा, अशी या परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांनी मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भेंडीबाजार परिसरातील गटारी साफ केल्या आहेत. गटारीच्या बाजुला ठेवलेल्या कचऱ्याची तातडीने उचल करावी, अशी मागणी होत आहे. बाजारपेठेमधील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करणे महत्त्वाचे आहे. भेंडीबाजार परिसरातील जशा गटारी साफ करण्यात येत आहेत. तशाच प्रकारे मुख्य बाजारपेठेतील गटारीही साफ कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी या गटारी साफ करणे नितांत गरजचे आहे. कारण गटारीमध्ये प्लास्टिक कचरा साचून आहे. पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे. तेंव्हा महानगरपालिकेने सर्वच गटारी साफ करणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
Previous Articleइंदिरानगर-अनगोळ येथील गटारी साफ करण्याची मागणी
Next Article पोलीस अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.