वृत्तसंस्था/ चेन्नई
अलीकडच्या कालावधीमध्ये 5जी सेवा देण्यासाठी विविध दूरसंचार कंपन्यांनी धडपड चालवली असून येणाऱ्या काळामध्ये 5जी वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एका अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार 2029 पर्यंत भारतामध्ये 5जी सेवा वापरकर्त्यांची संख्या 84 कोटींवर पोहोचणार आहे.
13 अब्ज ग्राहक संख्या
हे प्रमाण एकंदर मोबाईल ग्राहकांच्या तुलनेमध्ये पाहता 65 टक्के असणार आहे. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 2029 मध्ये या क्षेत्रामध्ये एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या 13 अब्ज होणार आहे. 5जी सेवा घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून वरील उद्दिष्ट नक्कीच साध्य केले जाणार आहे. अॅडव्हान्स मोबाईल ब्रॉडबँड आणि फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस प्रणालीची भूमिका याबाबतीत महत्त्वाची ठरली आहे.
5 जी ग्राहकसंख्या 5.6 अब्जवर पोहचणार
जागतिक स्तरावर 2029 पर्यंत 5जी वापरकर्त्यांची संख्या 5.6 अब्ज इतकी होणार आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये जर पाहिले गेल्यास तर 5 जी वापरकर्त्यांची संख्या ही 60 टक्के इतकी नोंदली जाईल. 2023 मध्ये 5जी वापरकर्त्यांची संख्या 11.9 कोटी इतकी झाली आहे.