प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 15 जुलैपासून भरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 10 दिवस कामकाज चालणार असून अधिवेशनात राज्यातील विविध समस्यांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी दिली. मंत्री एच. के. पाटील यांनी सोमवारी यासंबंधी पत्रक जारी केले आहे. कर्नाटक राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 15 जुलै ते 26 जुलै या कालावधीत भरविण्याची शिफारस राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे करण्यात आली आहे. 20 जून रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जुलैमध्ये अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेतला होता तसेच तारीख निश्चित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाची तारीख अंतिम केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.