ओटीटी कायद्याच्या कक्षेत आणा : ऑनलाईन जुगारावर बंदी घाला,हिंदुराष्ट्र अधिवेशनात ठराव
फोंडा : रामनाथी-फोंडा येथील अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात भारत व नेपाळ हे हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्याबरोबरच देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा, रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी ठोस कारवाई तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मला कायद्याच्या कक्षेत आणणे व ऑनलाईन रमीसारख्या जुगारांवर बंदी घालणे आदी मुद्द्यांवर ठराव घेण्यात आले. राज्य व केंद्र सरकारला या ठरावाच्या प्रती लवकरच सादर करण्यात येतील, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनिल घनवट यांनी दिली.
दि. 24 ते 30 जून या दरम्यान सुऊ असलेल्या या अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोमंतक मंदिर महासंघाचे राज्य सचिव जयेश थळी, हिंदू विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अॅड. नागेश जोशी व हिंदू जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यावेळी उपस्थित हेते. या अधिवेशनात अमेरिका, सिंगापूर, घाना, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांसह भारतातील सव्वीस राज्यातून विविध संघटनांचे एक हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील अभ्यासक, पत्रकार, संत, धर्माचार्य, मंदिरांचे विश्वस्त, वकील, उद्योजक आदींचा सभावेश होता.
हिंदू ‘इको सिस्टिम’ची निर्मिती
दरवर्षी हिंदूराष्ट्र अधिवेशनाला देशविदेशातून येणाऱ्या तसेच हिंदू राष्ट्र संकल्पनेशी जोडलेल्या सर्व हिंदू संघटनांनी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून वर्षभर कार्यरत राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून हिंदू ‘इको सिस्टिम’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज काश्मीर, बंगाल आदी प्रांतातील हिंदूवरील अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे शासनला हिंदूंच्या प्रश्नाची दखल घ्यायला लावणारा दबावगट कार्यरत करण्यात यावा आणि हिंदू समाजावरील अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभाऊन हिंदू राष्ट्र निर्माणाच्या कार्याला देशभर गती देण्याचा कृतीकार्यक्रम आखण्यात आल्याचे सुनील घनवट यांनी सांगितले.
अधिवेशनात संमत करण्यात आलेले विविध ठराव
अधिवेशनात भारत आणि नेपाळ यांना हिंदू राष्ट्र घोषित करणे, काशी-मथुरा आदी मंदिरे अतिक्रमणमुक्त कऊन ती हिंदूंच्या ताब्यात देणे, धर्मांतर आणि गोवंश हत्याविरोधी कठोर कायदा करणे, हलाल सर्टिफिकेशनवर बंदी घालणे, हिंदू मंदिरांचे सरकारीकरण रहीत करणे, प्लेसेस ऑफ वर्शिप तसेच वक्फ कायदे रहीत करणे, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे, काश्मिरी हिंदूचे पुर्नवसन, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा बंदी उठविणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे, ओटीटी प्लॅटफॉर्मला कायद्याच्या कक्षेत आणणे, ऑनलाईन रमी सारख्या जुगारांवर बंदी घालणे आदी विषयांवर ठराव घेण्यात आले आहेत.
सत्यविजय नाईक म्हणाले, अधिवेशनात हिंदू राष्ट्र स्थापनेविषयी समाजात जागृती आणण्यासाठी समानसूत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत हिंदू राष्ट्र समन्वय समिती, हिंदू राष्ट्र अधिवेशन, मंदिरांमध्ये प्रबोधन बैठक, देशभरात अनेक ठिकाणी राज्यस्तरीय मंदिर परिषद आयोजित करणे, लव्ह जिहाद तसेच हलाल जिहाद यांच्या संदर्भात जनजागृती बैठका व आंदोलने आदी विविध उपक्रम येत्या वर्षभरात राबविण्याचे अधिवेशनात ठरविण्यात आले आहे. हिंदू धर्मावर नाटक, चित्रपट अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून आघात झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाणार आहे.
मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी व्यापक अभियान
जयेश थळी यांनी मंदिर महासंघाच्या माध्यमातून सुऊ असलेल्या कार्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत अधिवेशनाद्वारे मंदिर संस्कृती रक्षा अभियान राबविण्यात आले आहे. त्यातून 710 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून अन्य मंदिरामध्येही ती लागू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंदिर महासंघाच्या वतीने देशभरात 14 हजार मंदिरांचे संघटन झाले आहे. हे संघटन व्यापक करण्यासाठी देशभरातील लहान मोठ्या मंदिरानांही त्यात सहभागी कऊन घेतले जाणार आहे. मंदिरांची सुरक्षा व संवर्धन करण्यासह मंदिरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांप्रमाणेच अन्य राज्यांतील मंदिरांचे संघटन करण्यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने अनेक ठिकाणी राज्यस्तरीय मंदिर परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. सेक्युलर सरकारने देशभरात हिंदूंच्या साडेचार लाखांहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण केले आहे. ही मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शंभर मीटरच्या परिघात मद्यमांस यावर बंदी घालण्यासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.
हेट स्पीचेसच्या खटल्यांमध्ये अडकविण्याचे षड्यंत्र
नागेश जोशी म्हणाले, अधिवेशनात देशभरातून 215 हून अधिक वकील सहभागी झाले होते. काशी, मथुरा, भोजशाळा आदी प्रमुख हिंदू मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा सुऊ आहे. सध्या देशभरात हिंदुत्वनिष्ठांना हेट स्पीचेसच्या खोट्या खटल्यांमध्ये गुंतवण्याचे काम अर्बन नक्षलवाद्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीने चालले आहे. अनेकदा असा अनुभव येतो की, प्रचारतंत्र, प्रशासनतंत्र, न्यायतंत्र यामध्ये अनेक कम्युनिस्ट विचारांच्या लोकांचा भरणा आहे. त्यांची एक इकोसिस्टिम कार्यरत असून ती हिंदू धर्मावर आघात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या विरोधात लढण्यासाठी वकिलांची संघटना वाढवण्यात येणार आहे.