बेळगाव : जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत जनजागृतीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनमानसात डेंग्यूबाबत जनजागृती केली जात आहे. दरम्यान पाण्याचा जास्तकाळ साठा करू नये, आपल्या परिसराची स्वच्छता ठेवावी, अशा सूचनाही करण्यात येत आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खात्याकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूबाबत जनजागृतीचे काम अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आले आहे. डेंग्यूबाबत सरकारनेही खबरदारी घेतली असून झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागात मच्छरदानी वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीटंचाईमुळे काही भागात अधिक दिवस पाण्याचा साठा करून ठेवला जातो. तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता नसल्याने या रोगाचा फैलाव वाढू शकतो. यासाठी नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेबरोबर पाण्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही नागरिकांना केल्या जात आहेत.
Previous Articleअमृत सरोवर निर्मितीत बेळगाव जिल्हा आघाडीवर
Next Article चोरी प्रकरणातील दागिने फायनान्स कंपन्यात गहाण!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.