बेळगाव : संततधार पावसामुळे बेळगाव ग्रामीण, खानापूर व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ, खानापूर व कित्तूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांचे हित लक्षात घेऊन बेळगाव ग्रामीण मतदारसंघ व खानापूर तालुक्यात मंगळवार दि. 6 ऑगस्ट ते शनिवार दि. 10 ऑगस्टपर्यंत, कित्तूर तालुक्यात 6 ते 8 ऑगस्टपर्यंत अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Previous Articleसुळेभावीत विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
Next Article ‘एसटी’साठी विधानसभेत राजकीय आरक्षण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.