प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार मार्गावरील करमल घाटात अपघाताची शृंखला चालूच असून 10 रोजी कारवारच्या दिशेने येणारे एक मालवाहू वाहन घाटातील एका धोकादायक वळणावर अपघातग्रस्त झाले. सुदैवाने या ट्रकचा चालक बचावला. या मार्गावर चालू वर्षी आतापर्यंत 20 ते 22 इतके अपघात झालेले असून सदोष रस्ता आणि धोकादायक वळणांचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. रस्ता रूंदीकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत असताना सरकारचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम म्हणून या मार्गावर दिवसाला एक याप्रमाणे अपघात घडत आहेत.