राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वप्रचारक सुनिल देवधर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /म्हापसा
आपण देशासाठी, समाजासाठी काय केले? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला अत्यंत गांभीर्याने विचारला पाहिजे. देशात दुःखी, वंचितांची संख्या खूप आहे. प्रत्येक छोटय़ा समाजासाठी करुणमयी व्हा, एकात्मता जीवन समररस असल्याचे जीवन बघायला पाहिजे. हे जर आम्ही जागायला सुरुवात केली तर आपल्या आचरणातून राष्ट्रीय समरसता पूर्ण चारित्र्य दिसायला लागेल. आपले वर्तन हे समाजोपयोगी, देश उपयोगी असले पाहिजे, महिलांचा सन्मान केला पाहिजे तरच आपला भारत बलशाली होईल यात काडीमात्र शंका नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक सुनिल देवधर यांनी ‘बलशाली भारत’ बोलताना केले.
नववर्ष स्वागत समिती म्हापसा आयोजित भारत व्याख्यानमाला ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त पोलीस अधीक्षक उमेश गावकर, उद्योजक विवेक केरकर, दीपक गोवेकर, अमय नाटेकर, संजय वालावलकर उपस्थित होते.
नेहरुंनी तिबेट देऊन टाकले
‘अतिथी देवो भव’ हे आमचे गुण आहेत. इशान्य भारतातील जंगली भागातील लोकांमध्ये ते गुण आजही पाहायला मिळतात मात्र अरुणाचलप्रदेशने चीनबाबत ते दाखविले नाही. अरुणाचलच्या लोकांनी चीन सैन्याला पाणीही देणे पसंत केले नाही. विचित्र अवस्थेत चीन सैन सापडले व त्यानंतरच चीन सैन्यांनी युद्धातून माघार घेतली. पण या देशाचे दुर्दैव म्हणजे त्यावेळी देशाचे पंतप्रधान पंडित नेहरु होते. चीनने भारताचा एक हिस्सा काबिज केला होता. लोकांनी नेहरुजींना चीनने काबीज केलेली एक भूमी आमची आहे ती मागून घ्या मात्र नेहरुजींनी त्यावेळी तिबेट देऊन टाकले. त्यावेळच्या राजाने पारपत्र चीनला देताना आमच्या मातीचा एक कणही देणार नाही असे सांगितले. या गोष्टी तुम्हाला कुणी सांगितल्याच नाही तर तुमच्या मनात त्या राजाबद्दल प्रेम कसे तयार होणार, असे देवधर म्हणाले.
पंतप्रधान मोदींमुळे देश बलशाली बनतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोकलामध्ये चीनला माघार घेण्यास भाग पाडले तेव्हा सर्व देश भारताकडे ताठ मानेने पाहु लागले. अगोदर चीन भारतातील राजकारण्यांना पैसे पुरवून कमकुवत करु पाहत होता. त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नये असे चीन व पाकिस्तानला वाटत होते. मोदी पंतप्रधान होताच चीनचे सर्व मनसुबे उधळले गेले. पंतप्रधान मोदी तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणीच विकत घेऊ शकला नाही. काँग्रेस काळात केंद्रीय संरक्षणातील मोठा हिस्सा गांधी परिवाराला जायचा. संरक्षण व्यवहारात कोटय़वधींचे घोळ व्हायचे. पण मोदींनी 200 कोटी पेक्षा खालची निविदा हे स्वदेशी कंपनी भरणार हा कायदा केल्यावर विदेशातून येणाऱया निविदा बंद झाल्या व लोखोंचे डिल संपुष्टात आले. त्यामुळेच यांना मोदी नको आहेत, अशी माहिती देवधर यांनी दिली.