कर्नाटकातील आणखी एका मठाधीशांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामनगर जिल्हय़ातील कुंचगल बंडेमठाचे (ता. मागडी) बसवलिंग स्वामीजींनी दिवाळीच्या दिवशीच 24 ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. 20 डिसेंबर 2021 रोजी याच मागडी तालुक्मयातील आणखी एका प्रसिद्ध चिलुमे मठाचे बसवलिंग स्वामीजींनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. केवळ एक वर्षाच्या आत एकाच तालुक्मयातील दोन मठाधीशांनी आपले जीवन संपविले आहे. आत्महत्या करणे म्हणजे महापाप आहे, असे महात्मा गांधीजींनी सांगितले आहे. वेगवेगळे मठाधीशही आपल्या प्रवचनात आत्महत्या का करू नये, याविषयी भाविकांचे प्रबोधन करत असतात. आता तेच मठाधीश स्वतःच मृत्यूला कवटाळत आहेत.
बंडे मठाधीशांनी आत्महत्या करण्यापूर्वी मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. आपल्या या अवस्थेला कोण कारणीभूत आहे, याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे. स्वामीजी हनीट्रपच्या जाळय़ात अडकले होते. एक व्हिडिओ समोर ठेवून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. बंडे मठाचे उत्तराधिकारी कोण? या वादाचीही किनार या आत्महत्येमागे आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. धरपकड केली जात आहे. चिलुमे मठाधीशांच्या आत्महत्येला जमीनवादाचीही पार्श्वभूमी आहे. बेअब्रू होण्याच्या भीतीने बंडे मठाधीशांनी आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्यांच्या संबंधी काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. यावरून समाजात मानाचे स्थान असलेले मठाधीशही मोहाला बळी पडत असल्याचे सामोरे येत आहे. खासकरून चित्रदुर्ग येथील प्रसिद्ध मुरुघा मठाधीशांना पोक्सो कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर अशा समांतर प्रकरणांनी उचल खाल्ली आहे.
कर्नाटकात मुरुघा मठाधीशांचा मोठा दबदबा होता. त्यांच्याभोवती मंत्री, मोठे अधिकारी यांचा नेहमी राबता असायचा. आपल्या शिक्षण संस्थेत शिकणाऱया अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली आहे. सध्या ते कारागृहात आहेत. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीनही मिळालेला नाही. मुरुघा मठाधीशांवरील कारवाईनंतर नेगिनहाळ, ता. बेळगाव येथील गुरुमडिवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंगेश्वर स्वामीजींनी आत्महत्या केली. 5 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मुरुघा मठातच त्यांचे आध्यात्मिक शिक्षण झाले होते. मुरुघा मठाधीशांवरील कारवाईनंतर झालेल्या मनस्तापातून त्यांनी आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणालाही एक कलाटणी मिळाली होती. दोन महिलांचे ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या संभाषणात नेगिनहाळ मठाधीशांच्या चारित्र्यासंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी आढळून आली होती. तेही प्रमुख कारण होते. आता बंडे मठाधीशांच्या आत्महत्येलाही असेच कारण आहे.
शिक्षण, अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात मठ आणि मठाधीशांचे योगदान मोलाचे आहे. कर्नाटकात तर जे सरकारला शक्मय झाले नाही ते शिक्षण क्षेत्रात मठांनी साध्य करून दाखविले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मठाधीशांकडे बघण्याचा दृष्टीकोन पवित्र असतो. अधूनमधून घडत असलेली अप्रिय प्रकरणे आणि यामध्ये झालेली मठाधीशांची धरपकड, आत्महत्यांचे सत्र आदी कारणांमुळे मठाधीश वेगळय़ा कारणांनी ठळक चर्चेत आले आहेत. अनेक प्रमुख मठाधीशांनी प्रसिद्धीपराङमुख राहून समाज विधायक कामे केली आहेत आणि ती निरंतर सुरूच आहेत. त्यामुळे अशा मठांची आणि मठाधीशांची नावे मोठय़ा आदराने घेतली जातात. पण अलीकडे घडत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मठाधीशांविषयी समाजमन कलुषित होताना दिसत आहे. तुमकूर येथील सिद्धगंगा मठाधीशांचे नाव मोठय़ा सन्मानाने घेतले जाते. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गोरगरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले जीवन वाहिले. त्यांच्या लिंगैक्मयानंतर शिष्यगण आणि भाविकांमध्ये पसरलेली दुःखाची लाट अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळते. दररोज दहा हजारहून अधिक मुलांचे भरणपोषण आणि शिक्षण येथे एका छताखाली होते. हे काम केवळ एक पुण्यात्माच करू जाणे.
कर्नाटकात हनीट्रपचे प्रकार वाढले आहेत. या टोळीसमोर अनेक जण फशी पडले आहेत. सर्वसामान्य नागरिकापासून ते राजकीय नेते, मठाधीश, उद्योजक हनीट्रपचे शिकार ठरले आहेत. जाळय़ात अडकविणाऱयांचा मुख्य हेतूच आर्थिक असतो. त्यामुळे बेअब्रू होण्याच्या भीतीने अनेक धनिक वाट्टेल ती किंमत मोजून जगासमोर नागवे होणे टाळतात. ज्यांना हे शक्मय झाले नाही, ते आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. सध्या असे प्रकार वाढले आहेत. समाजमाध्यमावर संपर्क साधून पहिल्यांदा मैत्रीची विनंती केली जाते. एखाद्याचे मन का दुखवा या हेतूने त्यांच्या मैत्रीचा स्वीकार केला जातो. मात्र, हीच उदारता नंतर चांगलीच महागात पडते. नग्न व्हिडिओ कॉलचे आमिष दाखवून सावजाला ‘पिंजऱया’त पकडले जाते. सर्वसामान्य माणूस फसतोच, मात्र, अशा प्रकरणांमध्ये मठाधीशांचीही नीतीमत्ता घसरताना दिसते. समाजात अनेक आमिषे पदोपदी आढळून येतच असतात. मात्र, त्यात आपण गुरफटावे किंवा त्यापासून स्वतःला परावृत्त करावे, हे सर्वस्वी आपल्या हातात असते.
कर्नाटक विधानसभेचे उपसभाध्यक्ष आनंद मामनी यांचे निधन झाले आहे. कोरोनाच्या काळात तत्कालिन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. वनमंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाच्या धक्क्मयात सावरण्याअगोदरच बेळगावला आणखी एक धक्का बसला आहे. आनंद मामनी हे सौंदत्तीचे. त्यांचे वडीलही आमदार होते. ते विधानसभा उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर आनंद मामनी आमदार झाले होते. वर्षभरात बेळगाव जिल्हय़ातील तीन दिग्गज राजकीय नेत्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे ते ज्या पक्षात होते त्या भाजपला तर धक्का बसला आहेच, उत्तर कर्नाटकाचेही मोठे राजकीय नुकसान झाले आहे.