वार्ताहर /किणये
अलीकडे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. फायद्याची व उत्तम शेती करावयाची असेल तर आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे याच उद्देशाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्ले येथे थेट शिवारातच रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवाप्पा शेळके होते.
बीएएसएफ औषध आणि बियाणांची कंपनी आणि गणराया एंटरप्रायजीसतर्फे शेतकऱ्यांचा मेळावा भरविण्यासाठी प्रामुख्याने सहकार्य केले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील आणि वसंत सांबरेकर उपस्थित होते.
यशवंत अष्टेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मेळाव्या संदर्भात माहिती दिली. तसेच मिरचीसह विविध पिकांबद्दल माहिती सांगितली.
आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी आणि नवनवीन बियाण्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावे, याबद्दल विनायक पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. केले.
गणराया एंटरप्रायजीसचे डीलर अमृत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी रमेश अष्टेकर, निलेश पाटील, नारायण बाबर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.