प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील राजीवडा समुदात 5 खलाशांसह मच्छीमार बोट बुडाल़ी यातील 1 खलाशी बेपत्ता झाला असून चौघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आल़े ही दुर्घटना रविवारी सकाळी 10 च्या सुमारास घडल़ी बेपत्ता झालेल्या खलाशाचा पोलीस स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने शोध घेत आहेत़ तर वाचवण्यात आलेल्या चौघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल़े
ओवेस मक्खी (21) असे बेपत्ता झालेल्या खलाशाचे नाव आह़े तर नईम शेख (21), उजेला मुल्ला (21), आफशान मेहबूब मुजावर (22) व ऐयाज माखजनकर (38, ऱा सर्व जयगड) अशी वाचवण्यात आलेल्या खलाशांची नावे आहेत़ त्यांची प्रकृती स्थिर असल्याची मा†िहती वैद्यकीय अधिकाऱयांकडून देण्यात आली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े बुडालेल्या बोटीचे नाव एम इब्राहिम असे असून ती मिनी पर्ससीन प्रकारातील आह़े या बोटीचे मालक इम्रान सोलकर (ऱा राजीवडा) हे असल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील 5 खलाशी हे इम्रान सोलकर यांची मच्छीमार बोट रविवारी सकाळी राजीवडा ते जयगड अशी घेवून जात होत़े
समुद्रात जोराने वारा येत असल्याने रविवारी सकाळी 10 च्या सुमारास जोरदार आलेल्या लाटेमुळे बोट समुद्रात उलटल़ी बोटीवरील पाचही खलाशी हे समुद्राच्या पाण्यात गटांगळ्य़ा घेवू लागल़े यावेळी समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमारांनी खलाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल़े यात चौघाजणांना वाचवण्यात मच्छीमारांना यश आल़े मात्र यापैकी एकजण बुडून बेपत्ता झाल़ा बोट बुडाल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े घटनेचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आल़ा वाचवण्यात आलेल्या खलाशांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आल़े
मच्छीमार बोटीवरील खलाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मच्छीमार बोटीवर काम करणाऱया खलाशांना लाईफ जॅकेट तसेच सुरक्षा साधने देणे गरजेचे असत़े असे असले तरी नियम धाब्यावर बसवून मच्छीमार बोट मालक खलाशांना कोणत्याही सोयीसुविधा पुरवत नाहीत़ मच्छीमार बोटीवरील खलाशांच्या जीवाशी खेळणाऱया नौकामालकांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़े