विविध संघटनांचा पाठिंबा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयातील 32 गावांमधील सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध दर्शविला असून आज सोमवारी धर्मवीर संभाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱयांबरोबरच इतर संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
शेतकऱयांनी हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे सकाळी 10.30 वाजता शेतकरी उपस्थित राहणार आहेत. 32 गावातील जमिनी जात असल्या तरी बेळगाव तालुक्मयासह खानापूर तालुक्मयातीलही शेतकरी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. तालुका म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला बेळगाव शेतकरी संघटना, बांधकाम संघटना, रयत संघटना, याचबरोबर बेळगाव बार असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स, याचबरोबर एपीएमसी, जयकिसान भाजी मार्केट यासह इतर संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चाला 10 हजारहून अधिक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या महिनाभरापासून या मोर्चासंदर्भात तालुक्मयातील बहुसंख्य गावांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला दाखवून द्यायचे आहे. या मोर्चाला हलगा-मच्छे बायपासमधील शेतकरीही पाठिंबा दिला असून हे शेतकरीही मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातून कित्तूर चन्नम्मा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, भारतीय कृषक संघटनेचे सिद्धगौडा मोदगी यांच्यासह इतर वकील व समितीच्या नेत्यांनी जनजागृती करून शेतकऱयांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आता शेतकऱयांनी तयारी केली असून कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
तालुक्मयातील 32 गावांमधील शेतकऱयांबरोबरच इतर गावातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
बांधकाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांच्यासह इतरांनी या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. बांधकाम कामगारांनीही या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला असून कामगारही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
चाबूकसह ट्रक्टर, टेम्पो, बैलजोडय़ा घेऊनच शेतकरी दाखल होणार
मोर्चामध्ये चाबूकसह ट्रक्टर, टेम्पो, बैलजोडय़ा घेऊनच शेतकरी दाखल होणार आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी शांततेने घोषणा देण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीने केले आहे.