सातारा प्रतिनिधी
उदयनराजे यांच्या चित्राचा नवा वाद निर्माण झालेला आहे. हा गेल्या आठ दिवसापासून रात्रीचा खेळ सुरू आहे. हा सगळा बलिशपणा सुरू असून त्यांचे कार्यकर्ते काय बुद्धीचे आहेत हे माहिती आहे. आता उदयनराजे यांच्या चित्रावर चर्चा राज्यसभेत होणार असून ते कुठं काढायच याचा निर्णय राज्यसभेत होणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यताऱ्यावर चित्र काढावे म्हणजे सगळ्यांना हायवेवरून दिसेल असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांची घेत कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी ही सुबुद्धी येवो अशी ईश्वराकडे प्रार्थना त्यांनी केल्याचे सांगितले.
मंगळवारी दिवसभर चित्रावरून नाट्य सुरू होते त्यावर काही पत्रकार हे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना भेटले त्यांना बाईट बाबत विनंती करताच त्यांनी बाईट दिली ते म्हणाले, हा नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद असेल किंवा जम्मू काश्मीरच्या वादापेक्षा हा वाद गहन आहे, असे म्हणावे लागेल. आज धुळवड आहे धुळवडीच्या निमित्ताने वेगळी सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. पण मला जी माहिती मिळाली ती की राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांचे चित्र काढायला परवानगी दिली जात नाही, त्यामुळे याची चर्चा राज्य सभेत होणार आहे. आता उदयनराजे यांचे पेंटिंग नेमकं कुठं काढायच याचा निर्णय राज्यसभाच देईल, अशा शब्दात त्यांनी उदयनराजे यांची फिरकी घेत पुढे ते म्हणाले, हा सगळा प्रकार बालिशपणाचा कळस म्हटला पाहिजे. यातुन काय साध्य होणार आहे. ठीक आहे. समर्थकांचा आग्रह आहे. समर्थक नेत्यांच्या पुढं पुढं आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडत असतात. नेत्यांनी पण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. शहरात असा वाद होऊ नये म्हणून आपल्या समर्थकाना आवर घालण्याचे काम नेत्यांनी केलं पाहिजे. पण नेताच रात्री अपरात्री चित्र कुठं काढायचा हे जाऊन बघत असला आणि पोलिसांबरोबर वाद घालत असला तर अवघड गोष्ट आहे. चित्र काढणाऱ्या समर्थकांची बुद्धी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझं तर म्हणणं आहे की शहरातल्या भिंतीवर नको तर अजिंक्यताऱ्यावर चित्र काढा म्हणजे सगळ्यांना हायवे वरून दिसेल, अशी टिप्पणी करत शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, हा काय सातारच्या विकासाचा मुद्दा आहे का. इमारतीवर पेंटिंग काढल्याने साध्य काय करायचे आहे यांना. मराठी मध्ये म्हण आहे, साठी बुद्धी नाठी. नुकताच महाराजांचा वाढदिवस झालेला आहे. त्यांची साठीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. महाराजांनी कुठे तरी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, कार्यकर्त्यांनी कुठे तरी विकास कामांवर भांडू देत, शासनाकडून निधीवर भांडू द्या, पोलीस अन्याय करत असतील तर पोलिसांवर आवाज उठवू देत, पण चित्र काढण्यावर वाद निर्माण करण्याचा आज दिवसभराचा प्रकार नाही तर गेले आठ दिवस रात्रीचा सुरू आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.त्यांनी आपल्या अशा कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम करावे अशी बुद्धी द्यावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असेही त्यांनी सांगितले.