तरुणभारत ऑनलाइन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात चांगलचं वातावरण तापलयं पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व या ठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचे ट्विट पुढीलप्रमाणे :
विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत.
त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान Narendra Modi जी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.