संघाचा भाग राहिलेल्या शार्दुल ठाकूर, अजिंक्य रहाणे व रवी शास्त्राr यांचा ‘एमसीए’कडून सन्मान
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलियातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ब्रिस्बेनमधील प्रतिष्ठित ‘गाबा’ मैदानावर कांगारूंचा पराभव करून ‘बॉर्डर-गावस्कर चषक 2020-21’ काबीज करणाऱया भारतीय संघाचा भाग राहिलेले क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, अजिंक्य रहाणे आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांना शुक्रवारी बीकेसी क्लब, मुंबई येथे आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आणि त्या ऐतिहासिक विजयाच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.
‘एमसीए’ने लगेच आपल्या इंस्टाग्राम पेजवर या तिघांच पुरस्कार प्राप्त करतानाचे छायाचित्र टाकले आणि त्याला ‘गाबा कॉन्करर्स’ असे कॅप्शनही दिले. जानेवारी, 2021 मध्ये झालेल्या त्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया सदर स्थळी कसोटी सामन्यांत 32 वर्षे अपराजित राहिला होता. त्यांचा त्यापूर्वी शेवटचा पराभव 1988 मध्ये वेस्ट इंडिजने केला होता. परंतु 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल (91 धावा), ऋषभ पंत (नाबाद 89) आणि चेतेश्वर पुजारा (56) यांच्या प्रयत्नांच्या जोरावर दृढनिश्चयी टीम इंडियाने किल्ला सर केला आणि 2-1 अशा निर्णायक फरकाने बॉर्डर-गावस्कर चषकावर कब्जा केला.
शार्दुल ठाकूरने सामन्यात 67 आणि 2 धावा केल्या तसेच 94 धावात 3 बळी आणि 61 धावांत 4 बळी अशी प्रशंसनीय अष्टपैलू कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने भारत 6 बाद 186 धावा अशा परिस्थितीत असताना वॉशिंग्टन सुंदरसोबत (62 धावा) सातव्या गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱया रहाणेनेही 37 आणि 24 धावांचे योगदान दिले. या ऐतिहासिक मालिकेत रवी शास्त्राr हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताचा आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखून ठेवण्याच्या बाबतीत घरच्या मैदानावर कस लागणार असून 9 फेब्रुवारीपासून त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.