सुळगा (हिं.) येथील घटना, ऊसतोडणी कामगाराचे बालक जखमी, भटक्मया कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सुळगा (हिं.) येथे भटक्मया कुत्र्याने ऊस तोडणी कामगाराच्या मुलावर हल्ला केला आहे. यात राहुल राजू गायकवाड (वय 12) हा मुलगा जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी बकऱयांचा फडशा पाडलेली घटना ताजी असतानाच पुन्हा भटक्मया कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने भटक्मया कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. सुळगा स्मशानभूमीजवळ या कामगारांनी तंबू ठोकून ऊस तोडणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, शुक्रवारी बाहेर खेळणाऱया ऊसतोडणी कामगाराच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला. यात तो जखमी झाला आहे. तातडीने सामाजिक कार्यकर्त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करून उपचार केले. सातत्याने भटक्मया कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने मानवाला धोका निर्माण झाला आहे. तुरमुरी कचरा डेपोमध्ये भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान ही भटकी कुत्री बेळगाव-वेंगुर्ला रोड आणि शेजारील शेतवडीत फिरत असतात. शेतवडीत असलेल्या नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. अलीकडे कुत्र्यांची संख्या वाढल्याने हल्ल्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. जखमी राहुलला उपचारासाठी दाखल करण्यास समिती नेते आर. आय. पाटील, विनायक तुप्पट, सचिन सावंत, सुनील आवडन, राज सांगावकर आदींचे सहकार्य लाभले.
शहरातील कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेबाबत संशय
नसबंदीबाबत गांभीर्याने लक्ष घालून कुत्र्यांवर उपाययोजना करा
शहरातील भटक्मया कुत्र्यांची नसबंदी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील चार महिन्यात 700 हून अधिक कुत्र्यांवर नसबंदी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र ही मोहीम कधी आणि कोणत्या परिसरात राबविण्यात येत आहे, याची माहिती उपलब्ध नसल्याने मनपाच्या नसबंदी मोहिमेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
शहर आणि उपनगरात भटक्मया कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून जनावरे आणि लहान मुलांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडत आहेत. मागील काही महिन्यात भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. सलग तीन वर्षे नसबंदी मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. पण कंत्राटदार मिळाला नसल्याने नसबंदी मोहीम राबविण्यात आली नव्हती. मात्र चार महिन्यांपूर्वी एक कंपनी निश्चित करण्यात आली असून नसबंदी मोहीम जुलैपासून राबविण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याला 200 ते 250 भटक्मया कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत 700 हून अधिक भटक्मया कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पण ही शस्त्रक्रिया केली जात आहे का? याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरात असंख्य ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य वाढले असून नागरिकांना आणि वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः कचराकुंडीजवळ भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी दररोज 10 ते 12 कुत्री पकडली जातात, असे सांगण्यात येत आहे. तर कुत्री पकडण्यासाठी कंपनीचे कर्मचारी गेले असता ही भटकी कुत्री गल्लीबोळातून निसटून जात असल्याचे आणि कर्मचाऱयांच्या हातीच न सापडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नसबंदीसाठी भटकी कुत्री केव्हा पकडली जातात? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांनी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत गांभीर्याने लक्ष घालून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.