ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-बेंगळूर महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रकने 10 ते 12 वाहनांना धडक दिल्याची घटना आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कपडे वाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अहमदाबादकडे निघाला होता. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास मुंबई-बेंगळूर महामार्गावरुन हा ट्रक जात असताना वडगाव पुलाजवळ ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् ट्रकने 10 ते 12 वाहनांना उडवले. त्यामुळे ही वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचे मोठे नुकसान झाले. यात पोलिसांच्या वाहनाचाही समावेश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.