माणूस हा भावनेवर जगणारा प्राणी आहे असे म्हणतात. अनेक भावना किंवा समजुती आपल्या मनात इतक्मया घट्ट रुजलेल्या असतात, की त्या तार्किकदृष्टय़ा समर्थनीय नाहीत, हे समजत असूनही प्राणपणाने जपल्या आणि पाळल्या जातात. कित्येक समजुती तर पिढय़ान्पिढय़ा जित्याजागत्या ठेवल्या जातात. पंजाबमधील पतियाळा जिल्हय़ातील सराजपूर गाव हे अशाच एका अनोख्या समजुतीने पिढय़ान्पिढय़ा प्रभावित झालेले गाव आहे. या गावात 300 घरे असून अनेक सधन लोक येथे राहतात. तरीही एकाही घराला दुसरा मजला नाही. सर्व घरे एक मजलीच बांधण्यात येतात. नवीन घर झाले तरी ते एक मजलीच असते.
यामागे ऐतिहासिक कारण आहे. गेल्या चार-पाच पिढय़ांपासून काही कारणामुळे किंवा कर्मधर्म संयोगाने गावकऱयांची अशी समजूत झालेली आहे, की घराला दुसरा मजला बांधण्यास काही ना काही गंभीर प्रसंग घरात राहणाऱयांवर गुदरतो. त्यांची मोठी हानी होते. या समजुतीचा पगडा इतका मोठा आहे, की श्रीमंत माणसेही दोन किंवा तीन घरे बांधतात, पण एका घराला दोन मजले बांधत नाहीत. पंजाबमधील तर्कशील सोसायटी नामक संस्थेने लोकांची ही भावना मोडण्याचा बराच प्रयत्न केला आहे. तथापि, त्यात यश आलेले नाही. दुसरा मजला बांधल्यास घरात दुर्घटना घडते, ही केवळ अंधश्रद्धा असली तरी ती दूर करणे आम्हालाही शक्मय झालेले नाही, असे या संस्थेचे कार्यकर्ते म्हणतात. गेली किमान 200 वर्षे ही समजूत या गावातील नागरिकांच्या मनात घर करून राहिली आहे.