शहीद दिन कार्यक्रमाला केजरीवालांसह पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत गुऊवारी शहीद दिनानिमित्त ‘मोदी हटाओ-देश बचाओ’ कार्यक्रम पार पडला. आम आदमी पार्टीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांनी ‘भारत माता की जय’ या घोषणा देऊन भाषणाची सुऊवात केली. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या ‘पोस्टर वॉर’बाबत जाहीर प्रतिक्रियाही दिली. दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित कार्यक्रमात दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्याशिवाय मंत्री सौरभ भारद्वाज, खासदार संजय सिंह, सुशील गुप्ता, आमदार राखी बिर्ला आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. जीएसटी आणि नोटाबंदीवरून सरकारला धारेवर धरण्याबरोबरच पंतप्रधान मोदी आपल्या मोजक्मया भांडवलदार मित्रांना देश विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही विकासाच्या नावावर मते मागतो. तरीही आमच्या विकासाच्या मार्गात केंद्रीय तपास यंत्रणांना गुंतवून अडथळे आणले जात असल्याचेही ते पुढे म्हणाले. तत्पूर्वी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधताना त्यांनी ‘मोदी हटाओ, देश बचाओ’चा नारा दिला. तसेच पोस्टरसंबंधी दाखल एफआयआरबाबत बोलताना हे पोस्टर देशाच्या कानाकोपऱ्यात लावले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहीद दिन का साजरा केला जातो?
शहीदांच्या स्मरणार्थ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 23 मार्च रोजी देशात शहीद दिन साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त श्र्रद्धांजली वाहिली जाते. या दिवशी भारताचे सुपुत्र भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली होती.