ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडी सरकारने आरेमधून (Aarey) कारशेड (CarShed)कांजूरला नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिंदे सरकार सत्तेत येताच कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी एक ट्विट केले आहे. मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नव्हता अशी भूमिका सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा हवाला देत सोमय्यांनी हा दावा केला आहे.
ट्विट करत सोमय्या म्हणताता की, आरे येथे कार शेड बनवण्यासाठी या पुढे झाडे तोडण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरे कार शेडच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गेल्या 31 महिन्यांपासुन कार शेड व कुलाबा सीप्झ मेट्रोचे काम रखडले आहे. आरे कार शेडचे काम त्वरीत पुन्हा सुरु करण्याची गरज आहे. असे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- राष्ट्रपती निवडणूकीसाठी शिंदेंची काॅंग्रेसवर नजर; २०० आमदार मतदान करण्याचा निर्धार
पर्यावरणप्रेमींचा विरोध का आहे
आरे मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेत बिबट्यांचा अधिवास असून इतर प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा वावर असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे. आरेमध्ये असणारी अशी जैवविविधता जपण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दाही पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.