प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्मयातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळविले. या स्पर्धा नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा शाळेत झाल्या. मुलांच्या व मुलींच्या थ्रो बॉल संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकाच शाळेने दोन विजेतेपद मिळविणे ही तालुक्मयासाठी अभिमानास्पद बाब आहे.
थ्रो बॉल संघाने उपांत्य सामन्यात रामदुर्ग संघाला आणि अंतिम सामन्यात बैलहोंगल संघाला 2-0 ने नमवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर मुलींच्या थ्रो बॉल संघाने प्रथम कित्तूर संघाचा नंतर उपांत्य सामन्यात बेळगाव शहर संघाचा आणि अंतिम सामन्यात रामदुर्ग संघाचा 2-0 ने पराभव करून विजेतेपद पटकाविले. शाळेचे दोन्ही संघ बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अबनाळी शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. प्राथमिक विभाग मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर तर मुलींच्या गटातून मलप्रभा मारुती गुरव, वर्षा विलास मेंडीलकर यांची निवड झाली.
तसेच शाळेचे अन्य स्पर्धक सचिन प्रभाकर डिगेकर, गुरुप्रसाद संजय गावकर, सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर या सर्वांनी तीन सामने जिंकले. अवघ्या अर्ध्या पॉईंटसाठी त्यांची संधी हुकली असली तरी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. सलग तिसऱयांदा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अबनाळी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधित्व करणार आहेत.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. एस. गुरव, रमेश कवळेकर, विजय पाटील, समीक्षा नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे, तर एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डिगेकर, उपाध्यक्षा सपना गावकर आणि गावकऱयांचे प्रोत्साहन मिळत आहे. खानापूर तालुक्मयाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची, शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा मिरजे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी, बीआरसी अधिकारी ए. आर. अंबगी, अक्षरदासोह अधिकारी महेश परीट, शिरोली सीआरपी बी. ए. देसाई यांनी अभिनंदन केले आहे.