वकिलांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
यापूर्वी विविध वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला होता. मात्र आता अन्नधान्यावरच पाच टक्के जीएसटी केंद्र सरकारने लागू केला आहे. त्यामुळे देशातील गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा तातडीने जीएसटी रद्द करावा अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, ॲडव्होकेट वाय. के. दिवटे, ॲडव्होकेट शरद देसाई, ॲडव्होकेट सुभाष मोदगेकर, ॲडव्होकेट प्रेमिला अप्पण्णावर, ॲडव्होकेट पी.एम. भंडारे, ॲडव्होकेट महांतेश हिरेमठ, ॲडव्होकेट राजू कांबळे यांच्यासह वकील उपस्थित होते.