ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज सेना भवनात पार पडली. आपल्या पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गटाची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी ठाकरे गटाचे मुख्य उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. आपल्यावकर निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहूले म्हणून काम करत आहे. त्यामुळे सध्याचा निवडणूक आयोग हा बरखास्त करावा आणि यासाठी निवडणूका घ्याव्यात असे मत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>> पक्षाचे नाव आणि चिन्हे चोरू शकतील पण ठाकरे हे नाव चोरू शकत नाहीत- उद्धव ठाकरे
यावेळी बोलताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकला गेला असून आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती आहे. त्यामुळे हा आयोग बरखास्त केला पाहिजे आणि प्रत्यक्ष निवडणूका घेऊनच निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग नेमला पाहिजे” अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा >>>>> मी माझ्या मतावर ठाम…1 लाख गुन्हे दाखल झाले तरी मी शिवसेनेतच- संजय राऊत
पुढे बोलताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगाला पक्षाच्या निधीवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. तसेच कोणाला काय मिळावे हे देखिल ठरवण्याचा अधिकार नाही. केवळ विधान परिषदेत असणारे बहूमतावर निवडणूक आयोग आपला आदेश पारित करू शकत नाही.” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.