प्रतिनिधी /बेळगाव
यावर्षी दहावीचा निकाल उत्तम लागला असून पदवीपूर्व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत. सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये अत्यंत माफक फी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा तिकडे आहे. परंतु पायाभूत सुविधांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने सरकारी कॉलेजमध्ये सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात प्रत्येकी 31 सरकारी पदवीपूर्व कॉलेज आहेत. यावषी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 28,557 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातून 42,416 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले असल्याने अकरावी प्रवेशाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच सरकारी पदवीपूर्व कॉलेजला जुन्या इमारती, प्राध्यापकांची कमतरता, शौचालयांचा अभाव अशा विविध समस्या आहेत. मागील वषी 20 हजार विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतला होता. यावषी यापेक्षाही संख्या वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे दोन सत्रात पदवीपूर्व कॉलेज सुरू करावे लागणार आहे.
बऱयाच सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये वर्गखोल्या कमी असल्याने दोन सत्रांमध्ये कॉलेज भरवावे लागते. जिल्हय़ातील अनेक कॉलेजमध्ये केवळ वाणिज्य व कला या दोनच शाखा उपलब्ध असल्याने ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचा अभ्यास करावयाचा आहे. त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अधिक फी भरून खासगी महाविद्यालये विद्यार्थ्यांना गाठावी लागत आहेत.
संकेश्वरमध्ये सरकारी कॉलेजची गरज
संकेश्वर शहराचा विस्तार झपाटय़ाने होत आहे. परंतु येथे सरकारी पदवीपूर्व कॉलेज नाही. यामुळे विद्यार्थ्यांना निपाणी अथवा महाराष्ट्रात शिक्षणासाठी जावे लागत आहे. खासगी कॉलेजची फी परवडणारी नसल्याने काहींवर शिक्षण थांबविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संकेश्वर परिसरात पदवीपूर्व कॉलेज सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
खानापूर तालुक्मयात पदवीपूर्व कॉलेजची कमतरता असल्याने तेथील विद्यार्थी शिक्षणासाठी खानापूर शहर व बेळगावकडे शिक्षणासाठी वळत आहेत. परंतु दुर्गम भागातून बससेवेची असणारी कमतरता यामुळे विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्मयात कणकुंबी, गुंजी, पारिश्वाड, चापगाव, हलशी येथे पदवीपूर्व कॉलेजची आवश्यकता आहे.
खानापूरमध्ये केवळ 2 सरकारी महाविद्यालये
बेळगाव जिल्हय़ातील एक दुर्गम तालुका असणाऱया खानापूरमध्ये खानापूर शहर व मुगळीहाळ या दोनच गावांमध्ये प्रत्येकी एक सरकारी कॉलेज आहे. तालुक्मयाचा विचार करता 260 गावे असून 50 हायस्कूल्स आहेत. परंतु 2 सरकारी व 20 पदवीपूर्व कॉलेज असल्याने प्रवेशाच्या समस्या निर्माण होत आहेत. तालुक्मयातील कणकुंबी, निलावडे, नागरगाळी, हेम्माडगा, गुंजी या भागात पदवीपूर्व कॉलेज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
प्रस्ताव सरकारकडे पाठविला
सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणतीही मर्यादा नाही. यामुळे अनेकदा मूलभूत सुविधा पुरविणे कठीण होते. शौचालय बांधकामासाठी 36 लाख रुपये निधी देण्यात आला. कित्तूर तालुक्मयात 4 ते 5 ठिकाणी कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
– व्ही. नागराज (पदवीपूर्व विभागाचे शिक्षणाधिकारी)