दुरुस्तीकडे दुर्लक्ष, साईडपट्टय़ा बुजविण्याची मागणी
वार्ताहर /नंदगड
खानापूर-यल्लापूर राज्यमार्गावरील खानापूर ते नंदगड रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या साईडपट्टय़ा उखडल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे झाले आहे. यामुळे दुचाकींचा अपघात होत आहे. तरी या खचलेल्या साईडपट्टय़ा भरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
खानापूर-नंदगड या रस्त्यावर वाहतूक मोठय़ा प्रमाणात असल्याने दुचाकी अथवा चारचाकी बाजूला घेताना तसेच रस्त्यावर येताना त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे छोटेमोठे अपघात होत आहेत. पावसामुळे या साईडपट्टय़ा आणखीणच खोल होणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ या साईडपट्टय़ा बुजवण्यात याव्यात, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.