मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ कार दुभाजकाला धडकली
प्रतिनिधी/ ठाणे
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार उद्योगपती सायरस मिस्री (वय 54) यांचा रविवारी दुपारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या चारोटी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले आहेत. अपघाताच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मिस्त्राr यांच्या निधनाने उद्योगजगतात हळहळ व्यक्त होत आहे.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्री हे अहमदाबादहून मुंबईला कारने चालले होते. त्यांच्या गाडीत चारजण होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीवरील पुलावर रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास सायरस मिस्त्राr यांची मर्सिडीज कार रस्ते दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी सर्व जखमींना तातडीने रूग्णालयात पाठवले. मात्र सायरस मिस्री व जहांगीर दिनशा पंडोले यांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्राr यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या अनामता पंडोले व दरियस पंडोले यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कार महिला चालवत असल्याचे वफत्त आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. धडक एवढी भीषण होती की, कारमधील काहीजण उडून बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात कारच्या पुढच्या भागाचा अक्षरक्षः चक्काचूर झाला आहे. कारमधील एअरबॅग्ज उघडल्या पण त्याचा फायदा कारमधील कोणालाही झाला नाही.
ख्यातनाम व्यापारी आणि उद्योगपताr
मिस्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झाले. इंपीरियल कॉलेज लंडनमधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते इन्स्टिटय़ूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सशी संलग्न आहे. सायरस मिस्त्राr हे देशातील एक ख्यातनाम व्यापारी आणि उद्योगपती होते, जे एका ट्रिलियनेअर कुटुंबातील होते. 2012 मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. ते रिअल इस्टेट व्यावसायिक पालोनजी शापूरजी मिस्री यांचे धाकटे पुत्र होते. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला आहे.
सर्वात मोठे खासगी भागधारक
सायरस मिस्री हे शापूरजी पालोनजी कुटुंबातील आहेत. शापूरजी हे पालोनजी समूहाच्या टाटा सन्सच्या होल्डिंग कंपनीतील सर्वात मोठे खासगी भागधारक आहेत.मिस्री यांची 2006 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. इतर अनेक समूह कंपन्यांमध्येही त्यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे भूषवली आहेत. यावेळी टाटा सन्सचे संचालक मिस्रीआणि टाटा ऍलेक्सी (भारत) हे देखील रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय निवड समितीमध्ये होते.
सर्वात तरुण अध्यक्ष
रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायरस मिस्री यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. सायरस टाटा सन्सचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. मिस्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागिदारी आहे. ते टाटा ट्रस्टमधील टाटा सन्सनंतर दुसरे मोठे समभागधारक आहेत. 2012 साली वयाच्या 43 व्या वर्षी ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 1887 साली स्थापन झालेल्या ’टाटा सन्स ’ ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. 2012 ते ऑक्टोबर 2016 दरम्यान ते या पदावर होते. टाटा सन्सचे 18 टक्के भांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.
अध्यक्षपदावरून हकालपट्टी
टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. सुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणाऱया सायरस मिस्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला 2019 मध्ये 13000 कोटींचा तोटा झाला होता मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्राr यांनी केला होता. तीन दशकांत पहिल्यांदाच टाटा समूहाला इतका प्रचंड तोटा झाला असून तो त्यांनी लेखा परीक्षणात दडवल्याचा दावा मिस्री यांनी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात केला होता. याच वादातून 2016 साली त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र
पारंपरिक बांधकामाच्या पलीकडे मोठय़ा अभियांत्रिकी प्रकल्पांपयत सायरस यांनी मजल मारली. परदेशातही व्यवसाय विस्तारला. रतन टाटा आणि सायरस मिस्त्राr यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे सायरस मिस्त्राr यांना अध्यक्षपदावरून पदावरून हटविले तरीही त्यांनी आपल्या स्वतःच्या उद्योगावर लक्ष करून यश संपादन केलं. विविध देशांमध्ये त्यांचा बांधकाम, ऊर्जा, अभियांत्रिकी उद्योग विस्तारला. अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय उद्योग जगतात सायरस मिस्री दखलपात्र ठरले. रविवारी सायरस मिस्री यांचा अपघाती मृत्यू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायरस मिस्त्राr यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते ट्विटद्वारे म्हणाले, ’सायरस मिस्त्राRचे अकाली निधन स्तब्ध करणारे आहे. त्यांचा भारताच्या आर्थिक शक्तीवर विश्वास होता. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे.