अपघात टाळण्यासाठी प्रयत्न : सरकारकडून आदेश जारी, लवकरच मोहीम सुरू करणार
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात आता रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक आहे. रिफ्लेक्टर न बसविल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाढते अपघात टाळण्यासाठी सरकारने हा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी सोमवारी बेळगाव येथील आरटीओंनी सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे रिफ्लेक्टर न बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात वाहनांना ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (एआयएस) प्रामाणित परावर्तक (रिफ्लेक्टर) बसविणे बंधनकारक करण्यात आले. दरम्यान हे रिफ्लेक्टर सध्या सहा कंपनीकडून वितरित करण्यात येत आहे. याला काही शुल्क आकारण्यात येत आहेत. बेळगाव येथील आरटीओंनी याबाबतची मोहीम सुरू केली आहे. विशेष करून अवजड वाहनांना अधिक प्रमाणात बसविण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. याची तयारी सुरू झाली असून आता ते बसविण्यासाठी आदेशही जारी करण्यात आला आहे. बेळगाव येथे मागील काही महिन्यांत वाहनांचे अपघात वाढले आहेत. याला विशेष करून वाहन समोरून किंवा बाजूने येताना दिसत नाही. त्यामुळे हे अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे आता ही मोहीम राबविण्यासाठी आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱयांनी कंबर कसली आहे. रात्रीच्यावेळी अपघात होवू नये, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर रहावे यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. वाहनांच्या दोन्ही बाजूला मान्यताप्राप्त वितरकांकडून हे परावर्तक लावणे बंधनकारक आहे. यासाठी आरटीओ कार्यालयातील काही कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहनला हा आदेश दिला आहे. खासगी वाहनांवर रिफ्लेक्टर न बसविल्यास वाहन नियमांतर्गत चालकांवर कारवाई केली जाईल. याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांची योग्यता तपासणी रद्द करण्यात येईल, असेही आरटीओंनी यावेळी सांगितले.
सध्या जे रिफ्लेक्टर बसविले आहेत, ते निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे वाहन कोठून येते याची माहिती मिळत नाही. परिणामी अपघातांना आमंत्रण मिळते. त्यामुळे मान्यताप्राप्त कंपन्यांकडून रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत, असे आवाहन केले आहेत. पांढरा, तांबडा, पिवळय़ा रंगाचे रिफ्लेक्टर आरटीओ कार्यालयात आहेत. यमनापूर येथे आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून ते बसवून घ्यावेत, असे आवाहनही केले आहे. सध्या सहा कंपन्यांनी याचे उत्पादन करून ते विक्रीला सुरुवात केली आहे.
रिफ्लेक्टर बसवून घेणे गरजेचे
वाढते अपघात लक्षात घेऊन वाहनचालकांनी रिफ्लेक्टर बसवून घेणे गरजेचे आहे. अधिकृत विपेत्यांकडून हे रिफ्लेक्टर खरेदी करण्याची गरज आहे. सरकारने नुकताच हा आदेश जारी केला आहे. वाहन कायद्यांतर्गत प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक आहे. सर्व वाहनचालकांनी ते बसवून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
–आरटीओ शिवानंद मगदूम