प्रतिनिधी / पणजी
समुद्र किनाऱयावर या अन्य ठिकामी बेकायदा चालणाऱया जलसफरी आयोजित करणाऱया बोटींवर कारवाई केली जात असून ही कारवाई सुरुच रहाणार आहे. असे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी सांगितले आहे. टुरीस्ट गाईड म्हणून बेकायदा वावरणाऱयांवरही कारवाई केली जाईल. दरम्यान अशा उल्लंघनासाठी पाच हजार रुपयापासून पन्नास हजार रुपये दंडाची तरतूदही केली आहे. असेही खवटे यांनी सांगितले.
काल गुरुवारी पत्रकारांशी बोलताना खवटे यांनी वरील माहिती दिली आहे. जे लोक जलसफरी आयोजन करण्याचे काम करीत आहेत हे गोमंतकीय आहे याची आम्हाला जाणीव आहे त्यांच्या उत्पन्ना आड येणे आम्हालाही आवडत नाही. पण बेकायदेशीर ओयोजनामुळे एखादा भयानक प्रकार घडल्यास त्याला जबाबदार पर्यटन मंत्री किंवा सरकारला धरले जाईल त्याचे काय. ज्यांना जलसफरी आयोजनाचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी पर्यटन खात्याने अधिसूचीत केलेल्या ठिकाणीच पर्यटन खात्याचे सर्व नियम पाळूनच करावे असेही खवटे म्हणाले.
अलीकडेच जाहिर केलेले जेटी धोरण हे पर्यटन जेटीवरील गैर प्रकार दुर करण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे. या धोरणाबाबत काही लोकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात कोळसा वाहतूकीसाठी तसेच जेटी धोरणाचा परिणाम पारंपारीक मच्छिमारांवर होइल असा चुकीचा आभास निर्माण केला जात आहे. पर्यटन विभागाने सुचना आणि हरकती मागितल्या असता हे लक्षात आले की बहुतेक सूचना आणि हरकती या कटपेस्टचा भाग आहे. ज्यांना किनारी भागात गैर प्रकार करायचे आहेत तेच लोक जेटी धोरणाला विरोध करीत आहेत असेही रोहन खवटे यांनी सांगितले.
पुढे बोलताना खवटे म्हणाले की समुद्र किनाऱयावर बेकायदेशीर कृत्य करणाऱयांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. पर्यटन खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार फौजदारी समितीच्या कलम 188 अतंर्गत पोलीस अधिकारी नियमांचे उल्लंघन करणाऱयांना तुरुंगात टाकू शकतात. काही लोक या निर्णयावरही टीका करीत आहेत. एका बाजूने पर्यठक मद्यापान करून रस्त्यावर बाटल्या फोडतात पण पर्यटन खाते काही करीत नाही म्हणून आवाज करतात तर दुसऱया बाजूने कायदा केला तरीही टाकी करतात हा कायदा अगोदर होता त्यात नवीन काय असाही प्रश्न काही जण उपस्थित करीत आहेत. सुरुवातील नियमांचे उल्लंघन करणाऱयांना केवळ दंड ठोठावला जात होता. 34 कलमाखाली ताब्यात घेऊन नंतर त्याला सोडले जात होते. आता उल्लंघन करणाऱयांने दंड भरण्यास नकार दिला तर त्याला थेट पोलीस कोठडीत टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत असेही खवटे म्हणाले. किनाऱयावर वाहने चालविणे किंवा उघडय़ावर स्वयंपाक करणे सार्वजनिक ठिकाणी मद्यापन बेकायदा दलाली फेरीवाल्याकडून पर्यटकांचा रस्ता अडविणे. अनधिकृत बोटींग किंवा जलक्रिडा आयोजन करणे या सारख्या विविध कामांना पर्यटन खात्याने उपद्रव म्हणून जाहिर केले आहे. अशीकृत्य करताना अढळ्यास पोलीस त्यांना तुरुंगात टाकण्याची कारवाई करणार. पर्यटन क्षेत्रातील गैर प्रकार नष्ट करण्यासाठी आणि पर्यटकाना चांगले अनुभव देण्याच्या दिशेने ही पाऊले उचलण्यात आली आहे.