प्रशासन तुमच्या दारी उपक्रमातून मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी समस्या जाणून घेतल्या
धारबांदोडा : सरकारी अधिकाऱ्यानी नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले पाहिजेत. नागरिकांच्या तक्रारी सरकारपर्यत पोचण्यापुर्वी संबधित अधिकाऱ्यांनी जलदगतीने काम केले पाहिजे. जे अधिकार लोकांच्या समस्येकडे दाद देत नाहीत अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा पशुसंवर्धन मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिला. प्रशासन तुमच्या दारी या उपक्रमाला धारबांदोडा तालुक्यात चांगला प्रतिसाद लाभला. पशुसंवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर व आमदार गणेश गावकर यांनी तालुक्याच्या समस्या जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्या सरकारला नऊ वर्षे पुर्ण होत असून डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून चार वर्षे पुर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून या उपक्रमाचे धारबांदोडा तालुक्dयातील प्रशासकीय संकुलाच्या सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिण्dयाचे पाणी, कमी दबावाचा वीज पुरवठा, बागायती लागणाऱ्या पाण्याची कमतरता, रस्ते, रस्त्याच्या बाजूला वाढलेले झुडपे, जमिनी हक्क, वन हक्क कायदा, प्रशासन या विषयीच्या समस्या सरपंच, पंचसदस्य व इतर नागरिकांनी यावेळी मंत्र्यासमोर समस्या मांडल्या.
देश प्रगतीपथावर नेण्यासाठी हातभार लावा- मंत्री हळर्णकर
अंत्योदय तत्वानुसार प्रशासन प्रत्येक घरापर्यंत पाहोचले पाहिजे अशी पंतप्रधान नरेंद्र मादी यांची योजना आहे. म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा राज्य प्रगतीपथावर आहे. पुर्वी देशातील तरूण नोकरीसाठी परदेशात जात होते, मात्र परदेशी तरूण नोकरीसाठी भारत देशात यावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहेत असे ते पुढे बोलताना म्हणाले. सरकार आपल्या दायी या उपक्रमातून सर्वानी सावर्डे मतदारसंघातील महत्वाच्या अशा समस्या मंत्र्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यातील बारा तालुक्यापैकी धारबांदोडा तालुका हा शेवटचा, ग्रामिण व अविकसीत राहिलेला तालुका आहे. अजूनही या तालुक्यात शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे. त्dयादृष्टीने तालुक्यात तीन ठिकाणी 5 एमएलडी पाणी प्रकल्प भरण्याची योजना आखण्यात आली आहे. सावर्डे मतदारसंघ हा लांबलचक असल्याने लांब पल्ल्याच्या वीज वाहिन्या टाकलेल्dया आहेत. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणार होंत आहे. याची जाणीव सरकारला आहे. पंचायतीला जे अनुदान मिळत होते ते सध्या बंद आहे, हे अनुदान पंचायतीना मिळाल्यास पंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. असे आमदार गणेश गावकर म्हणाले. त्याच्यासोबत व्यासपीठावर आयएएस अधिकारी स्नेहा गिते, धारबांदोडा उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुर्टीकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालकक डॉ. मिस्कीता, मत्योद्योग खात्याचे संचालक डॉ. शमीला मोंतेरो उपस्थित होते. संतोष प्रभू, धारबांदोडा सरपंच विनायक गावस, कुळे शिगांव उपसरपंच नेहा मडकईकर, मोले सरपंच कपिल नाईक, साकोर्डा उपसरपंच शिरिष देसाई, पंच महादेव शेटकर, संजना नार्वेकर, गोविंद सावंत, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सुवर्णा तेंडूलकर, नंदेश देसाई यांनी समस्या मांडल्या.