प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव येथे रिंगरोडच्या विरोधात बेळगाव तालुका समितीने शासनाविरोधात चाबूक मोर्चा आयोजित केला होता. या चाबूक मोर्चास खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा जाहीर केला होता. या मोर्चात बेळगाव येथे सहभागी होऊन रिंगरोडच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला. तालुक्यातून माजी आमदार दिगंबरराव पाटील व गोपाळ देसाई यांच्या नेतृत्वाखाली समितीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी 10 वाजता येथील शिवस्मारकात एकत्र येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करून बेळगाव येथे मोर्चासाठी रवाना झाले. धर्मवीर संभाजी चौकातील या मोर्चात सामील झाले होते.
यावेळी तालुक्यातून विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, यशवंत बिर्जे, सुनिल पाटील, अनिल पाटील, अमृत पाटील, आबासाहेब दळवी यासह इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.