साडेसहा हजार शेतकऱ्यांनी भरला विमा : बदलत्या वातावरणामुळे विम्याला प्रतिसाद
बेळगाव : संकटकाळात शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी खात्याने विमा योजना लागू केली आहे. या विमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला आहे. जिल्ह्यातील 6,738 शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. अलीकडे विमा सुरक्षा कवच घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे संकटकाळात या विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई मिळत असते. जिल्ह्यातील 216 डाळिंब बागायतदार, 203 ओली मिरची बागायतदार, 5832 द्राक्ष बागायतदार तर 787 आंबे बागायतदारांनी विमा भरला आहे. बागायत खात्यामार्फत खरिप आणि रब्बी हंगामासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. चालू हंगामामध्ये 6738 शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. बदलत्या हवामानामुळे बागायतदारांना फटका बसू लागला आहे. दरम्यान द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबे, ओली मिरची आदी पिकांसाठी विमा भरण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची चिंता करण्याची गरज नाही. भरपाईसाठी ठराविक रक्कम खात्याने निश्चित केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. अतिवृष्टी, वादळ, किडीचा प्रादुर्भाव, बदलते हवामान आदी कारणांमुळे बागायती शेतीला फटका बसतो. दरम्यान अवकाळी पावसामुळे झाडे भुईसपाट होतात. त्यामुळे लाखो ऊपयांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत ही विमा योजना शेतकऱ्यांना आधार ठरणार आहे. जिल्ह्यात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी खात्यामार्फत ही योजना राबविली जात आहे. याला प्रतिसाद वाढू लागला आहे.
बेळगाव जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक बागायतदार
बेळगाव जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक शेतकरी बागायत शेती करतात. विशेषत: अथणी तालुक्मयात द्राक्षांचे उत्पादन अधिक होते. तर बेळगाव आणि खानापूर तालुक्मयात काजू उत्पादन होते. त्याचबरोबर इतर ठिकाणी डाळिंब, आंबे, पेरू, कलिंगड आदी उत्पादन घेतले जाते. अलीकडे बागायत क्षेत्र वाढले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे.