आमदार हसन मुश्रीफ यांचे निर्देश
प्रतिनिधी/कोल्हापूर
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे उर्वरीत प्रश्न लवकर मार्गी लावा, असे निर्देश आमदार हसन मुश्रीफ यांनी संबंधित यंत्रणेला गुरुवारी येथे दिले. आंबेओहोळ प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रभारी अपर जिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, आज्रयाचे तहसीलदार विकास अहिर, उपजिल्हाधिकारी दिनेश खट्टा आदी उपस्थित होते.
बैठकीत आंबेओहोळ प्रकल्पामधून शेतीच्या पाणी उपसा करण्यासाठी लागणारे परवाने शेतकर्यांना तातडीने द्यावेत, अशा सुचना आमदार मुश्रीफ यांनी कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना दिल्या. महावितरणने अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसून मागेल त्याला वीज परवाना द्यावा, असे मुश्रीफ यांनी महावितरणच्या अधिकायांना सांगितले. तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनीवरील वर्ग दोन हा शेरा व आदेशावरील कब्जेहक्काच्या रक्कमा कमी करण्याच्या सूचनाही आज्रयाचे तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आल्या. बुडीत गावांच्या लाभक्षेत्राबाहेरील जमिनीवरील ’लाभक्षेत्रात समाविष्ट’ हा नजरचुकीने पडलेला शेरा रद्द करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बेळुंकी (ता. कागल) येथील गायरानातील भूखंडधारकांचे भूखंड त्यांच्या नावावर करून त्यांना न्याय द्या व मदत करा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी 21 हेक्टर संपादित जमिनीचा निवाडा लवकरच जाहीर करू, असे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, अर्दाळचे माजी सरपंच विजय वांगणेकर, माजी सरपंच शंकर पावले, करपेवाडीचे सरपंच मच्छिंद्र कडगावकर, शिवाजीराव कुराडे, संजय येजरे, मधुकर पुंडपळ, सखाराम कदम आदी उपस्थित होते.
पुनर्वसनप्रश्नी लवकरच मुंबईत बैठक
प्रकल्पातील 355 स्वेच्छा पुनर्वसन घेतलेल्या शेतकयांना आर्थिक पॅकेनुसार पॅकेज मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तसेच, निवडय़ातील मूळ रक्कम न स्वीकारलेल्या प्रकल्पग्रस्तांची 65 टक्के रक्कम भरून त्यांना जमिनी अथवा आर्थिक पॅकेज मिळण्याचाही प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. या दोन्ही मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याबरोबर लवकरच बैठक आयोजित करू, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.